हरित क्रांतीचा नारा दिल्यापासून ( बहुधा १९७० पासून ) शेतकऱ्यांना गाजर दाखवणे सुरु झाले ते अजुनही सुरूच आहे. आणि आता पोट भरलेली मंडळी उंटावर बसून गाजर दाखवत आहेत. प्रकाश बाबा आमटे सारखा कुणी शेतकऱ्यांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता नाही. काही असतील ते आपली पोथी घेऊन तेथे जातात. शेतकऱ्यांपेक्षा गडचिरोली जिल्यातील आदिवासी जास्त नशीबवान आहे असे नाइलाजाने म्हणावे लागते.
सोमवार, १५ डिसेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा