पंचावन्न कोटीचे बळी .............
From the post of Ajit PhanseAjit Phanse, Ajay Patil and Tukaram Bhosale posted in कारण एकच राजकारण.
Ajit Phanse
January 30 at 8:21am
इयत्ता चौथी च्या पुस्तकात नथूराम गोडसे ह्या माथेफिरुने तत्कालीन भारत सरकारने पकिस्तानला 55कोटि दिले म्हणून म.गांधीं ना ठार मारले असे वाचले होते तेव्हा पासुन नथूराम म्हणले की 55कोटि आठवायचे आणि त्याने बरोबरच केले असे वाटायचे.ह्या समजुती ला जोरदार तडाखा दिला तो जगण फडणिसांनी.
महात्म्याची अखेर ह्या पुस्तक प्रकाशच्या निमित्ताने तें सातारयाच्या नगर वाचनालयात आले होते, त्यानिमित्त त्यांनी तासभर भाषण केले आसवे. आपल्या पुस्तकातील महत्वाच्या बाबी स्पष्ट करताना नथुरामने फाळणी पूर्वीच म .गांधींना मारण्याचे अनेक प्रयत्न केले होते हे तपशीलवार सांगितले, ते भाषण ऐकून मी हादरलो .अरे 55कोटि चा प्रश्नच नसताना हा मनुष्य म.गांधींना मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे काय ? मग तो माथेफिरु पण नसणार. मग तो चौथीचा धडा कोणी लिहिला असावा. अनेक प्रश्न मनात उभे राहिले.जगण फडणिसांचे ते पुस्तक ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर देते.ते पुस्तक वाचून मग मी जिथे जिथे संधी मिळेल तिथे नथूरामाचे खोटेपणा सांगू लागलो.पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वी गांधीजी पाचगणीला आले असताना त्यांच्यावर नथूने हल्ला केला असल्याची नोंद आहे आणि हा हल्ला रोखला होता भिलार या पाचगणी जवळच्या गावातील बाळासाहेब भीलारे या तरुणाने.
हल्ला करताना नथूचा हात बाळासाहेब भीलारेने तो वरच्या वर पकडला होता. बाळासाहेब भीलारे ना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तो पत्रकार मित्रांच्या मुळे त्यावेळी तें राष्टावादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी तोच किस्सा पुन्हा एकदा सांगितला. गांधी हत्या प्रयत्नात फाळणी प्रश्नच नसताना होता ह्याचा तो जीता जागता पुरावा होता.
पाचगणी पोलीस स्टेशनला आज ही त्या गुन्ह्याची नोंद आहे
आज हत्येनंतर 55कोटी साठी म.गांधी जी चा ख़ून केला असे उल्लेख असलेले पाठ्यपुस्तक नाही तसेच नथू भक्त पण कबूल करतात हत्या 55कोटी साठी नव्हतीच.
फाळणीचा प्रश्न नसताना सन 1934 पासुन म.गांधीजीना नथूराम मंडळी मारण्याचे प्रयत्न करित होती.ह्या मंडळी नी कधी फाळणी ज्यांनी केली तें ब्रिटिश किंवा ज्यांना फाळणी पाहीजे होती तें मुस्लिम ह्यांना कधी मारण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न आज ही अनुत्तरित राहतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा