शनिवार, २७ जून, २०२०

१९६२ चे युद्ध विसरू नका असा सल्ला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या "भीष्म पितामहां'नी राहुल गांधींना दिला आहे. १९६२चा इतिहास लक्षात ठेवायचा तर मग "१९६५चा इतिहास की जेंव्हा भारतीय सैन्याने लाहोरला वेढा घातला होता आणि १९७१चा इतिहास जेंव्हा भारताने पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली होती व ९३००० (त्र्याण्णव हजार) पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी  ताब्यात घेतले होते आणि पाकिस्तानची फाळणी घडवून आणून बांगलादेशची निर्मिती केली होती", हा इतिहास सुद्धा लक्षात ठेवावा लागेल. बिग बी सारख्या सुपरस्टारचा प्रत्येक सिनेमा हिट झालेला नाही. धोनीने प्रत्येक सामना जिंकलेला नाही. सचिन तेंडुलकरने प्रत्येक चेंडूवर षटकार मारलेला नाही, गोलंदाज प्रत्येक ओव्हरमध्ये बळी घेत नाही. वाजपेयींसारखा लोकप्रिय नेता प्रत्येक निवडणूक जिंकलेला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक युद्ध जिंकलेच पाहिजे असे नाही. महाराष्ट्रातील जनता खंजीर खुपसण्याचा इतिहास विसरून एकत्र आलेच ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: