रविवार, ९ मे, २०२१

परवा ७ मेला कवीवर्य गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकूर यांची १६०वी जयंती साजरी करण्यात आली. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे  राष्ट्रगीत ठाकुरांनी लिहिले आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये प्रत्येक सुशिक्षित हिंदू/मुस्लिम व्यक्तीच्या घरामध्ये रवींद्रनाथ ठाकूर व काझी नझरुल इस्लाम यांचे फोटो असतात.. मला नाही वाटत बंगाल व बांगलादेश सोडून भारतातील एखाद्या प्रांतातील लोकं आपल्या घरात कवी/विचारवंतांचा फोटो आपल्या घरात लावत असतील. बांग्लादेशमध्ये एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के लोक. मुस्लिम आहेत. पण अक्खा देश बंगाली भाषा बोलतो.  ठाकुरांनी आपल्या आयुष्याची बरीच वर्षे तेंव्हाच्या पूर्व बंगालमधील काही शहरांमध्ये  घालविली आहेत. तेंव्हा रस्ते मार्ग बरेच बिकट होते म्हणून ठाकूर तिकडे जलमार्गाने जात असत. त्यासाठी ते पद्मा नावाच्या बोटीचा वापर करत. त्या बोटीची प्रतिकृती बांगलादेशने भारताला भेट दिली आहे. बंगाली भाषा आल्याशिवाय बांगलादेशचे नागरिकत्व मिळत नाही. बंगाल प्रांताची पहिली फाळणी ब्रिटिशांनी १९०५ साली केली होती. हिंदू बहुलांचा पश्चिम बंगाल तर मुस्लिम बहुलांचा पूर्व बंगाल. मात्र हिंदू,मुस्लिम दोघांनीही या फाळणीचा कडाडून विरोध केला. ६ वर्षे वंगभंगाच्या तीव्र चळ्वळीनंतर अखेर १९११मध्ये ब्रटिटिशांना ही फाळणी रद्द करावी लागली. मात्र १७४७साली सगळ्यांचा नाईलाज झाला. पूर्व बंगालचा पूर्व पाकिस्तान झाला. पश्चिम बंगाल भारतात आला.  १९७१साली पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानचे जोखड झुगारून दिले. पूर्व बंगालचा स्वतंत्र बंगलादेश झाला. २०११साली रवींद्रनाथांची दीडशेवी जयंती होती. ती भारत आणि बांगलादेश यांनी सयुंक्तपणे साजरी केली. त्याचा शुभारंभ ढाक्यात तीन दिवसांच्या कार्यक्रमात झाला. बंगलादेशामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांच्या नावाने विद्यापीठ आहे. तात्पर्य ज्या प्रांतात सर्व जातीधर्माचे लोकं एकच भाषा बोलतात त्यांच्यामध्ये फूट पाडणे अशक्य आहे. १९०५साली इंग्रजांनी बंगालमध्ये तो प्रयत्न करून पहिला आणि २०२१मध्ये..... एबीपी माझाला रामराम ठोकून आस्ट्रेलियाला गेलेलय हर्षदा स्वकुळ यांचा हा व्हिडीओ पाहण्याकरिता दिलेल्या ब्ल्यू लिंकवर क्लिक करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: