सोमवार, २२ जून, २०१५

अडवाणी म्हणतात पुन्हा आणीबाणी येणार आहे.  कोण आणणार ?कॉंग्रेस ? तो तर विरोधी पक्षात आहे. म्हणजे मग मोदी. कारण …मोदी/भाजपला हुकुमशाही हवी आहे. पंतप्रधान असतांना नेहरूजी परदेश दौर्यावरून परत आल्यानंतर आपल्या दौऱ्याची माहिती राष्ट्रपतीना (ते देशाचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे) द्यायचे. तसेच कॉंग्रेस अध्यक्षांना सुद्धा दौऱ्याचा अहवाल द्यायचे कारण सरकार हे सत्ताधारी पक्षाची ध्येय धोरणे राबवीत असल्यामुळे पक्ष प्रमुखांना सरकार काय करते आहे हे सांगणे लोकशाही पक्ष पद्धतीत आवश्यक असते. इंदिरा जी ह्या सुद्धा राष्ट्रपतींना परदेश दौऱ्याचा अहवाल द्यायच्या. काँग्रेस अध्यक्षांना मात्र त्या माहिती द्यायच्या नाहीत. कारण त्या स्वत:च काँग्रेस अध्यक्ष होत्या. मोदींनी मात्र परदेश दौरयांवरून परत आल्यावर राष्ट्रपतीची भेट घेतल्याची एकही बातमी वाचण्यात आली नाही. किंबहुना शपथविधी झाल्यानंतर मोदी राष्ट्रपतींना सदिच्छा भेट म्हणून भेटले असेही ऐकिवात नाही. याचे कारण असे की मोदी आणि भाजप यांना राष्ट्रपती, संसद, निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांबद्दल मुळीच आदर नाही. विरोधात असतांना दोन वर्षे भाजपने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. वारंवार राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळे नेउन राष्ट्रपतींना जनतेची निवेदने स्वीकारणार्या तहसीलदाराच्या स्तरावर आणून ठेवले होते. मुख्य निवडणूक आयुक्त हे हिंदू नाहीत हे लोकांच्या लक्षात आणून देण्याकरिता त्यांच्या नावाचा जे एम लिंगडोह असा उल्लेख न करता जेम्स मायकेल लिंगडोह असा उल्लेख भाजपवाले करायचे. पर्रीकर तरी सरंक्षण मंत्री झाल्यावर राष्ट्रपतींना की जे तिन्ही दलांचे (भूदल, वायुदल, नौदल) चे सर्वोच्च कमान्डर आहेत, भेटले की नाही माहित नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: