शुक्रवार, १ मे, २०१५

हे महानाट्य कुठल्या शिवचरित्रावर आधारित होते  ?

 आमच्या शहरात काही वर्षांपूर्वी " जाणता राजा" या महानाट्ट्याचा प्रयोग पहायला  गेलो होतो. त्यात असे दाखविले होते की, काशीचे गागाभट्ट हे फिरत फिरत महाराष्ट्रात आले होते व त्यांच्या या महाराष्ट्र पर्यटनाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक उरकून घेतला. त्याआधी आम्हाला माहित असलेला इतिहास असा की पुण्याच्या ब्रम्हवृंदाने शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळातील नाहीत सबब त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही असे म्हणून राज्याभिषेकावर बहिष्कार टाकला होता. नंतर या प्रकरणाचा उत्तरार्ध असा कळला की गागाभट्टांनीसुद्धा या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य करण्यासाठी महाराजांकडून जबर फ़ी वसूल केली होती. या घटनेचा महानाट्यात काहीही उल्लेख नव्हता. हे महानाट्य कुठल्या शिवचरित्रावर आधारित होते हे मला पडलेले कोडे आहे. महानाट्यातून जमा झालेली प्रचंड धनराशीचा काय व कसा सदुपयोग झाला हेही समजले नाही. शिवाय एवढे मोठ्या संख्येने कलावंत संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन फिरण्याचा खर्च वाचविण्यासाठी ठीकठिकाणच्या स्थानिक कलावंतांना प्रतिभा दर्शनाचे गोड आमिष दाखवून फुकटात राबवून घेतले ते वेगळेच. कारण आमच्या शहरातील मुले दोन महिने घरचे खाउन या महानाट्याच्या तालमीला जात होती.
 राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: