रविवार, १ जून, २०१४

जनतेच्या पैशाचे जनतेकडूनच लेखापरीक्षण व्हावे - पी. साईनाथ
सोळाव्या लोकसभेच्या सभागृहात ५४३ खासदारांपैकी ४४२ खासदार कोटय़धीश आहेत. या खासदारांची सरासरी मालमत्ता १४.६१ कोटी रुपये आहे. कोटय़वधी रुपयांचे मालक असणारे ८२ टक्के खासदार संसदेत आहेत. त्यामुळे जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठीच वापरला जाईल, याची खात्री देता येणे अवघड आहे. जर सर्वसामान्य माणसाच्या बाजूने आर्थिक प्रगती करावयाची असेल तर जनतेच्या पैशाचे सामाजिक लेखापरीक्षण व्हायला हवे. करप्रणाली पारदर्शक व्हायला हवी आणि घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे हक्क म्हणून समावेशित केली जावीत, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.
( सविस्तर बातमी दि. ३१/०५/१४ च्या लोकसत्तामध्ये )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: