शनिवार, ७ जून, २०१४

… आणि रिलायन्सला कंठ फुटला वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून वर्षभरापूर्वी वाद सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या करारात ठरलेला दरच घेण्याची तंबी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर इतके दिवस मूग गिळून गप्प बसणाऱ्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'ला आता केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर मात्र कंठ फुटला असून दराबाबत मुख्यमंत्र्यांचा इशारा धाब्यावर बसवण्यापर्यंत 'रिलायन्स'ची मजल गेल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.
मेट्रो प्रकल्प बांधण्याचा आणि तो ३५ वर्षे चालवण्याचे कंत्राट 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'च्या अखत्यारितील 'मुंबई मेट्रो वन प्रा. लि.' या कंपनीस देताना किमान तिकीट दर नऊ रुपये असेल तर कमाल १३ रुपये असेल असे करारात ठरवण्यात आले होते. करारानुसार या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये होता. प्रकल्प बराच काळ रखडल्याने तो आता ४३२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. परिणामी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव 'रिलायन्स'ने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारपुढे ठेवला होता. दहा रुपये ते ४० रुपये तिकीट दर असावेत अशी त्यांची मागणी होती. ( सविस्तर बातमी आजच्या लोकसत्ता मध्ये )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: