ग. दि. माडगुळकर उर्फ गदिमा हे द्रष्टे कवी होते. १९६४ साली त्यांनी ' मल्हारी मार्तंड ' या चित्रपटासाठी एक गीत लिहिले होते. त्याचे बोल होते, " फड सांभाळ, तुरयाला ग आला, तुझ्या उसाला लागला कोल्हा. वसत पवार यांनी संगीत बद्ध केलेले व सुलोचना चव्हाण यांनी गायलेले हे गाणे अख्या मराठी जगात पोहोचले. त्या गाण्यातील इशाऱ्याची प्रचीती २०१४ च्या निवडणुकीत आली. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसाला भाजपचा कोल्हा लागला. आणि उसाचा हा फड कोल्ह्याने फस्त केला. गीतातील शेवटच्या कडव्यात तर वास्तवाचे अचूक चित्रण गदिमांनी केले आहे त्या ओळी अशा. -
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन् गेला.
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन् गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा