मंगळवार, २७ मे, २०१४

शरीफी शहाणपण 

आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरी गोगलगायीच्या गतीनेच चालत असतात. त्यात प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांसारखा गुंतागुंतीचा असेल तर ही गोगलगायदेखील मंदावते. मंगळवारची मोदी-शरीफ चर्चा केवळ शिष्टाचार होती आणि तीतून पंतप्रधान मोदी यांनी काही साध्य करून दाखवणे अपेक्षितच नव्हते.. असे असताना मोदी यांनी किती कडक मागण्या पाकिस्तानपुढे ठेवल्या, अशा बातम्या पेरणे हे मोदींच्याच प्रयत्नांना खीळ घालणारे ठरेल..
बंदुकांचा आणि तोफगोळय़ांचा आवाज येत असेल तर चर्चा कानावर येत नाही, असे मत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांत वारंवार व्यक्त केले होते. त्या प्रचार सभांनंतरच्या निवडणुकांत मोदी यांना सत्ता मिळाली आणि हे बंदुकांचे आणि तोफगोळय़ांचे आवाज शांत व्हायच्या आत त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. निवडणूक प्रचारसभा आणि सत्तांतर या काळात भारत-पाक सीमेवरील परिस्थिती मूलत: बदलली असे नव्हे. तरीही मोदी यांना पाकिस्तानशी चर्चा करावीशी वाटली. सत्ता ही व्यक्तीस सहनशील होण्यास कशी भाग पडते, याचे हे उदाहरण. ( आजच्या लोकसत्ता मधील अग्रलेख. सविस्तरपणे वाचण्याकरिता भेट द्या www.loksatta.com )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: